महामार्गावर दुचाकी घसरल्याने तिघे गंभीर जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील बच्छाव शोरूम समोरील महामार्गावर दुचाकी घसरल्याने दुचाकीवरील तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी २६ जून रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली आहे. जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून नशिराबाद पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, सचिन पुंडलिक पाटील (वय-२२)रा. नशिराबाद ता.जि.जळगाव हा तरूण परिवारासह वास्तव्याला आहे. तो जळगाव एमआयडीसीतील सुप्रिम पाईप कंपनीत कामाला आहे. सोमवारी २६ जून रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारा नशिराबाद येथून जळगाव शहरात दुचाकीने येण्यासाठी निघाला. त्यासोबत दुचाकीवर तेजस्वी रविंद्र पाटील (वय-१७) आणि कृष्णा सोनू माळी (वय-७) रा. भवानी नगर, नशिराबाद हे देखील होते. नशिराबादकडून जळगाव शहरात येत असतांना रस्त्यावरील बच्छाव शोरूम समोरील महामार्गावर अचानक दुचाकीचा ताबा सुटल्याने दुचाकी घसरली. या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने खासगी वाहनाने तिघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये सचिन पाटील यांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघात प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Protected Content