महापुरूषांचे पुतळे हटविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना तात्काळ अटक करा

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील दिक्षीत वाडी परिसरात सन – १९८३ पासून स्थापन असलेल्या तथागत गौतम बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे हटवण्याचे षडयंत्र केले गेले. ह्या गैरकृत्यामुळे सर्व आंबेडकरी जनतेच्या भावना अत्यंत तीव्र दुखावल्या असून पाचोरा येथील आंबेडकरी जनता व विविध संघटनांचे प्रतिनिधींतर्फे दोषींना तात्काळ अटक करण्यात यावी अशा आषयाचे निवेदन पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये देण्यात आले.

 

सदरचे निवेदन सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी स्विकारले. निवेदन देते प्रसंगी समता सैनिक दलाचे जिल्हा प्रचारक किशोर डोंगरे, सुनिल शिंदे, दिपक आदिवाल, मा. नगरसेवक अशोक मोरे, खंडु सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते आकाश नन्नवरे, राहुल अहिरे, सचिन शिरसाठ, अमोल म्हस्के, सचिन देहडे, आकाश खैरनार, दिपक वाकडे, भिमराव लहासे, शुभम खैरे, दिपक सोनवणे सह मोठ्या संख्येने पाचोरा येथील आंबेडकरी जनता व विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे हटविणे ही बाब अत्यंत गंभीर असून पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याने दोषींवर कलम १२० (ब) ही लावण्यात यावे. ही घटना १६ मार्च रोजी घडली असुन आज रोजी १२ दिवस उलटूनही जळगाव पोलिस दोषींना पकडू शकले नाहीत ही बाब अत्यंत खेदजनक असून गंभीर आहे. याबाबत विधान परिषदेत दोन वेळा चर्चा होवून व उपसभापतींनी आदेश देवून सुध्दा पोलीस यंत्रणा दोषींना पकडू शकत नाही. यामुळे आमच्या सारख्या सामान्य लोकांना काय न्याय मिळेल ? असा प्रश्न उभा राहतो आणि जनतेच्या भावना संविधानाच्या चौकटीत तीव्र दुखावल्या असून आपल्या स्थरावरुन दोषींना अटक करत आम्हाला न्याय द्यावा अन्यथा आंबेडकरी जनता व विविध संघटनांतर्फे कायदेशीर पध्दतीने आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन पाचोरा येथील विविध संघटना व सर्व आंबेडकरी जनतेतर्फे पाचोरा पोलिस स्टेशनला देण्यात आले आहे.

Protected Content