श्री क्षेत्र अक्कलकोट स्वामी समर्थांच्या “पालखी-पादुका” शनिवारी जळगावात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचे शनिवारी १ एप्रिल रोजी शहरात शुभागमन होणार आहे.

 

सकाळी ११ वाजेला सिंधी कॉलनी रस्त्यावरील श्रीरामदेव बाबा मंदिराजवळून पादुकांची सवाद्य मिरवणूक निघून गणेशवाडी परिसरातील भीमराव शिरसाळे यांच्या निवासस्थानी येईल व तेथेच पूजा -आरती होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम होईल, त्यानंतर संध्याकाळी 5 वाजेला पादुका मार्गस्थ होणार आहे.

 

परगावच्या भाविकांना महाराजांच्या दर्शनाचा लाभ व्हावा या उद्देशातून श्री क्षेत्र अक्कलकोट येथील अन्नछत्र मंडळाच्या वतीने महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा अशी पालखी परिक्रमा आयोजित केली जाते. त्यात अन्नछत्र मंडळातील अन्नदान व नव्याने निर्माणाधिन भक्त निवासासाठी निधी उपलब्ध करण्याचाही उद्देश आहे. जळगाव शहरात गेल्या १६ वर्षापासून या परिक्रमेचे आगमन होत आहे.

 

कोरोनामुळे २ वर्षांच्या खंडानंतर यावेळी 1 एप्रिल शनिवारी शहरात श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचे आगमन होत असुन भाविक भक्तांनी दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिरसाळे यांनी केले आहे.

Protected Content