महापालिकेच्या सरदार वल्लभभाई पटेल टॉवरवर तिरंगा झेंडा लावा – दीपककुमार गुप्ता यांची मागणी

जळगाव, प्रतिनिधी |महापालिकेची प्रशासकीय इमारत सरदार वल्लभभाई पटेल टॉवरवर भारताचा तिरंगा झेंडा लावण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी सोमवारी ३१ जानेवारी रोजी दुपारी महापालिका आयुक्त सतिष कुळकर्णी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

 

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगांव महानगरपालीकेचे सरदार वल्लभभाई पटेल टॉवर हे अंदाजे १०-१५ किलोमीटरच्या परीसरापर्यंत दृष्य आहे त्यावरील तिरंगा झेंडा हा आणखी दुरपर्यंतच्या नागरीकांना दिसेल व याद्वारे जळगांव महानगरपालीकेचा गौरव वाढेल. जळगाव महानगरपालीकेच्या सरदार वल्लभभाई पटेल टॉवरवर भारताचा तिरंगा झेंडा लावल्यास जळगाव महानगरपालीका ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्वात उंच तिरंगा झेंडा लावणारी एकमेव महानगरपालीका म्हणून गौरवास येणार आहे. दरम्यान तिरंगा झेंडा हज कमीटी बिल्डींग, मुंबई येथे, भुसावळ येथे रेल्वे यार्डात, अमळनेर येथील नगरपालीका येथे आजही तिरंगा झेंडा मोठ्या शानमध्ये फडकत आहे, तसेच त्याची निगा देखील राखली जात आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष घालून तिरंगा झेंडा लावण्याची कारवाई यावी. अशी मागणीचे निवेदन माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी महापालिका आयुक्त सतिष कुळकर्णी यांना दिले आहे.

Protected Content