मयूर कॉलनी परिसरातील महिलेचा विनयभंग

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मयूर कॉलनी परिसरातील एका भागात राहणाऱ्या एका ४७ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ४ जणांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

रामानंदनगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील मयूर कॉलनी परिसरातील एका भागात ४७ वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ११ जून रोजी सायंकाळी ६ वाजता काहीही कारण नसताना समाधान खंडू सोनवणे, त्याची पत्नी, त्याचा मुलगा आणि शालक चौघे रा. राजीव गांधी नगर, जळगाव अशा चौघांनी काही कारण नसताना महिलेचे पती व पुतण्या यांना बेदम मारहाण केली, त्यानंतर एकाने महिलेचा हात पकडून विनयभंग केला. आणि महिलेचे पती आणि पुतण्या यांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली घडल्यानंतर पिडीत महिलेने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार रविवारी ११ जून रोजी रात्री ९ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोहेकॉ उषा सोनवणे करीत आहे.

Protected Content