मनसेने केंद्र सरकारला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिलाय : एकनाथ खडसे

Raj 2

 

मुंबई (वृत्तसंस्था) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घुसखोरांविरोधात मोर्चा काढून एकप्रकारे केंद्र सरकारला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला असल्याचा दावा भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा मनसे-भाजप आघाडीची चर्चा सुरु झाली आहे.

 

खडसे पुढे म्हणाले की, अनधिकृतपणे राहणाऱ्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांमुळे देशातील कायदा सुव्यवस्था बिघडत चालली आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी घुसखोरांना देशाबाहेर काढण्यासाठी जो लढा सुरु केलाय त्याला नक्की प्रतिसाद मिळेल. तसेच राज ठाकरेंच्या मोर्चाची दखल घेऊन घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी त्वरीत पाऊले उचलली पाहिजेत. तसेच या मोर्चाला अभूतपूर्व यश मिळाले आहे. याचाच अर्थ असा होतो की, बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना देशबाहेर हाकलले पाहिजे, असे जनसामान्याचे मत आहे, असेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

Protected Content