जळगाव, प्रतिनिधी । ग्रामपंचायत निवडणूकीतील उमेदवारांचे भवितव्य १५ तारखेला इव्हिएम मशीनमध्ये बंद झाले आहे. आता सर्वांचे सोमवारी होणाऱ्या मतमोजणीकडे लक्ष लागून आहे. प्रशासनाने मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे.
जळगाव तालुक्यातील ४३ गावांची मतमोजणी नूतन मराठा महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी १० वाजता सुरु होणार आहे. यासाठी १० टेबलावर १७ फेर्यांमध्ये मतमोजणी करण्यात येणार आहे. मतमोजणी करतांना मोठ्या गावांना आधी प्राधान्य देण्यात येणार आहे. एका फेरीत एका गावाचा निकाल लागणार आहे. सर्व फेऱ्या पूर्ण होण्यासाठी जवळपास दुपारचे ३ वाजणार आहेत. सकाळी १० वाजता मतमोजणीस प्रारंभ होऊन साधारणता साडे दहा वाजता पहिला निकाल हाती येण्याची शक्यता तहसीलदार नामदेव पाटील यांनी व्यक्त केली आहे.
https://www.facebook.com/508992935887325/videos/224958485838133