भारत-चीन सीमेवर चकमक, एका अधिकाऱ्यासह दोन जवान शहीद

लडाख (वृत्तसंस्था) चिनी सैन्य आणि भारतीय सैन्यामध्ये गॅल्वान खोऱ्यात सुरू असलेल्या डी-एस्केलेशन प्रक्रियेदरम्यान सोमवारी रात्री झालेल्या चकमकीत कर्नलसह दोन भारतीय जवान शहीद झाले आहेत.

 

गेल्या काही दिवसांपासून चीनचे सैनिक भारतीय हद्दीत अतिक्रमण करत होते. त्यामुळे भारत आणि चीन दरम्यान पूर्व लद्दाख जवळच्या ताबा रेषेवर गेल्या महिनाभरापासून संघर्ष सुरू आहे. मात्र सोमवारी रात्री चिनी सैन्याने पुन्हा भारतीय सैन्यावर हल्ला केला. मागे हटण्याच्या वादात गोळीबार झाला. त्यात कर्नलसह दोन जवान शहीद झाले आहेत. दरम्यान, प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ चीनच्या भागात मोल्डो जवळ भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाल्यानंतरही चकमक झाल्यामुळे सीमेवर प्रचंड तणाव वाढला आहे.

Protected Content