भारताला युद्ध नाही, बुद्ध पाहिजे. पण चीनला युद्ध हवे असल्यास भारत तयार : रामदास आठवले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारताला युद्ध नाही, बुद्ध पाहिजे. पण चीनला युद्ध हवे असल्यास भारत तयार आहे, असे वक्तव्य रिपाइं अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

 

रामदास आठवले पुढे म्हणाले की, भारताने चीनला बुद्ध दिला आहे, युद्ध दिलेले नाही. पण चीनला युद्धाची खुमखुमी असेल, तर भारतीय सैन्य चीनला कायमचा धडा शिकवतील. भारतात कोरोनाशी युद्ध सुरु आहे. त्यामुळे आता आम्हाला युद्ध नको बुद्ध हवा आहे. ‘कोरोना’शी सुरु असलेले युद्ध जिंकणार आहोत आणि वेळ आल्यास चीनशीही युद्ध जिंकू, असेही आठवले म्हणाले.

Protected Content