भारताची नव्या दिशेने वाटचाल होतेय – रतन टाटा

ratan tata

नवी दिल्ली वृत्तसंस्था । भारत एक नव्या दिशेने वाटचाल करत असून पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्याकडे देशासाठी एक व्हिजन आहे. त्यांनी अनेक दूरदर्शी पाऊले उचलली आहेत. आपल्याला अशा दूरदर्शी सरकारची मदत केली पाहिजे, अशा शब्दांत टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा यांनी मोदी सरकारचे कौतुक केले आहे. गुजरातची राजधानी गांधीनगर येथे इंस्टिट्यूट ऑफ स्किल्सच्या (आयआयएस) भूमीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.

देशातील तरुणांना पुरेशा संधीची गरज आहे. पण तरुण पूर्णपणे कौशल्यपूर्ण होतील तेव्हाच त्यांना या संधी मिळतील. तरुणांच्या कौशल्याविना देशाची प्रगती होऊ शकणार नाही. आपल्याला नव्या क्षमतांची आवश्यकता आहे आणि हे एका ध्येयपूर्ण संकल्पनेशिवाय शक्य नाही, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. गांधीनगर येथे आयआयएसची स्थापना करण्यासाठी टाटा ग्रुपने केंद्र सरकारसोबत भागीदारी केली आहे. कौशल्य कार्यक्रमाशी जोडले जाण्याची संधी दिल्याबद्दल रतन टाटा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. मी २० वर्षांचा असतो, तर या कामात आणखी जास्त क्षमतेने सहभाग घेतला असता, अशी इच्छाही त्यांनी बोलून दाखवली.

Protected Content