ब्रेकींग : सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ढकलण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून स्थानिक निवडणुकांबाबत जोरदार राजकीय चर्चा सुरू आहेत. निवडणूकीपुर्वी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा वादात आणि न्यायप्रविष्ठ आहे. तर दुसकरीकडे राज्यात गेल्या आठवड्यांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहेत. या अनुषंगाने सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून घेण्यात येणाऱ्या राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. आता या निवडणुका ३० सप्टेंबर रोजीपर्यंत ढकलण्याचा निर्णय सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निर्णय घेतला आहे.

Protected Content