बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करच्याविरोधात देशद्रोहाची तक्रार

मुंबई (वृत्तसंस्था) बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करच्याविरोधात देशद्रोहाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. चिथावणीखोर वक्तव्यांनी दोन समाजात द्वेष निर्माण करत असल्याचा आरोप स्वरावर ठेवण्यात आला आहे.

 

आपल्या वादग्रस्त भाषणांमधून, वक्तव्यांतून दोन समाजामध्ये द्वेष पसरविण्यांचे काम करत असल्याचा आरोप कानपूरमधील वरिष्ठ वकील विजय बक्षी यांनी करत स्वरा भास्कर करत देशद्रोहाची तक्रार दाखल केली आहे. स्वरा यांनी आपल्या भाषणांमधून आणि ट्विटमधून प्रत्येकवेळी भारत सरकार, न्यायालय आणि सुऱक्षा रक्षकांवर टिप्पणी केली आहे. यामुळे समाजात तेढ निर्माण झाली आहे. स्वरामुळे जगभर भारताची प्रतिमा मलिन होत असल्याचे बक्षी यांनी म्हटले आहे. कानपूरच्या कोर्टात त्यांनी याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी २० मार्चला सुनावणी होणार आहे.

Protected Content