बहिणाबाई जयंतीनिमित्त काव्यरत्न पुरस्काराचे वितरण

जळगाव, प्रतिनिधी  । अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ प्रणित बहिणाई ब्रिगेड या संघाच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंती निमित्ताने कविरत्न पुरस्कार सोहळा बहिणाबाई उद्यान येथे आयोजित करण्यात आला . कार्यक्रमाची सुरुवात बहिणाबाईंच्या पुतळ्याचे पुजन व माल्यार्पण करून “अरे संसार संसार ” या कवितेच्या गायनाने झाली .    

कार्यक्रमात तुषार वाघूळदे , के. के.  भोळे , शितल पाटील , प्रा. डॉ.  संध्या महाजन , डॉ. ए. के. नारखेडे , सुनीता येवले , प्रा. डॉ. प्रकाश महाजन , मनीषा चौधरी , सविता भोळे या साहित्यिकांचा कविरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ए. के. नारखेडे यांनी आपल्या मनोगतातुन लेवा गणबोलीचे संवर्धन व जतन करावे तसेच लेवा गणबोलीतील साहित्य व काव्य यावर संशोधन व्हावे हि अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहिणाई ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा आशाताई कोल्हे होत्या . तसेच प्रमुख अतिथी म्हणून महापौर सौ. जयश्रीताई महाजन , अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाचे प्रदेश अध्यक्ष प्रदीपदादा भोळे , जिल्हा कार्याध्यक्ष अमोल कोल्हे , महानगर अध्यक्ष अतुल महाजन, विवेक जावळे हे होते . कार्यक्रमाच्या यशस्वीत्यासाठी बहिणाई ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्ष सौ. हर्षाताई बोरोले , जिल्हाध्यक्षा  सौ. सुनीता येवले , महानगर अध्यक्षा श्रीमती साधनाताई लोखंडे व सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अनिता पाटिल यांनी तर आभार सौ. भावना चौधरी यांनी मानले.  कांचन आटाळे,  मिनाक्षी पाटील, तृप्ती आटाळे , रजनी महाजन , अंजली चौधरी , अंजली नारखेडे , छाया भोळे, पुष्पा पाटील  या सर्वांची नियुक्ती करून सन २०२०-२१  ची नूतन कार्यकारणी तयार करण्यात आली .

 

Protected Content