बस-ट्रकच्या अपघातात १९ जण ठार

चेन्नई वृत्तसंस्था । तामिळनाडूत बस आणि ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात १९ जणांचा मृत्यू झाला असून २० पेक्षा जास्त जखमी झाले आहेत.

तामिळनाडूमधील तिरुपूर जिल्ह्यातील अविनाशी शहराजवळ केरळ राज्य महामंडळाच्या बसचा ट्रकशी भीषण अपघात झाला आहे. यात १९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. तर २० पेक्षा अधिकजण जखमी झाले असल्याचीही माहिती समोर आली आहे. संबंधीत बस कर्नाटकातील बंगळुरूहून केरळमधील एरर्नाकुलमला जात होती. या अपघातातील १९ मृतांमध्ये १४ पुरूष व पाच महिलांचा समावेश आहे. पघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली, यानंतर स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

Protected Content