बंडखोरांसाठी शिवसेनेची दारे खुली – आदित्य ठाकरे

मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | बंडखोर आमदारांना अद्यापही शिवसेनेची दारे खुली असून त्यांनी मातोश्रीवर यावे असे आवाहन युवासेना प्रमुख तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

 

एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या बंडखोर आमदारांना जर परतायचे असेल तर अद्यापही मातोश्रीचे दरवाजे खुले असल्याचे वक्तव्य शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केले आहे. ते निष्ठा यात्रे अंतर्गत दहिसर परिसरात आले असता बोलत होते. शिवसेनेच्या बांधणीसाठी आदित्य ठाकरे हे राज्यभर निष्ठा यात्रेच्या निमित्ताने दौरा करत आहेत. शिवसैनिक नेहमीच मातोश्रीवर येतात. ज्यांना परतायचे आहे त्यांनी मातोश्रीवर येवून उद्धव ठाकरे यांची भेट घ्यावी त्यांना माफ केले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पुढे बोलताना त्यांनी सांगितले की,  ज्यांना परत यायचंय त्यांच्याकरता मातोश्रीचे दरवाजे कायम खुले आहेत. जे पळून गेलेत त्यांच्यातही दोन गट आहेत ते लवकरच समोर येतील. काही जणांच्या राक्षसी महत्वाकांक्षा आहोत मात्र काहींना जबरदस्ती नेलंय. थोडी जरी लाज, हिंमत उरली असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरं जा, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

Protected Content