फैजपूर-भुसावळ रस्त्याचे भाग्य उजळणार !

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । समरसता महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना येण्याजाण्यासाठी कोणताही त्रास होवू नये यासाठी फैजपूर- भुसावळ रस्त्या दुरूस्तीच्या कामाला सुरूवात करण्यात येत आहे. यासाठी महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी स्थानिक मंत्र्यांकडे पाठपुरावा केल्याने फैजपूर-भुसावळ रस्त्याचे भाग्य उजाळणार आहे.

गेल्या अनेक दिवसापासून फैजपूर भुसावळ हा रस्ता खड्डेमय झाला होता. प्रवाशी नागरिक त्रास्त झाले होते. मात्र रस्ता दुरुस्त होत नव्हता. वाहनधारकांना मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागत होती. बऱ्याच दिवसापासून वेळोवेळी मागणी करून सुद्धा सदरहू काम होत नव्हते. फैजपूर-भुसावळ रस्ता दुरुस्तीस शासनाची स्थगिती होती. महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी घेतलेल्या समरसता महाकुंभासाठी येणाऱ्या भाविक भक्तांनाही याचा खुप त्रास सहन करावा लागणार असल्याने त्यांनी लक्ष घालून मंत्री महोदय ना. गिरीश भाऊ महाजन, आ. राजुमामा भोळे, आ. संजयभाऊ सावकारे, यांचेशी चर्चा केली. यासाठी श्री. अमोल हरीभाऊ जावळे, निलेश (पिंटूभाऊ) राणे यांनी पाठपुरावा केला. या मागणीचे गांभीर्य व मागणी लक्षात घेऊन शासनाचे गुरूवारी २२ डिसेंबर २२ च्या पत्रानुसार ना. गिरीशभाऊ महाजन यांनी शासनाकडून स्थगिती उठविली आहे. तात्काळ कामास सुरुवातही करण्यात येत आहे. महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांचेसह नागरिकांकडून याबाबत शासनाचे आभार व्यक्त केले आहे.

Protected Content