पोलीस महानिरिक्षकांची अपघातस्थळाला भेट

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथील भीषण अपघाताने समाजमन सुन्न झाले असतांना आता विशेष पोलीस महानिरिक्षक प्रताप दिघावकर यांनी अपघात स्थळाची पाहणी केली आहे.

किनगाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास आयशर ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात १५ मजुरांचा मृत्यू झाल्याने परिसर हादरला आहे. मयत सर्व जण हे रावेर तालुक्यातील रहिवासी असून अत्यंत गरीब कुटुंबातले होते. त्यांच्या मृत्यूने परिसरावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, आज दुपारी विशेष पोलीस महानिरिक्षक प्रताप दिघावकर यांनी अपघातस्थळाला भेट दिली. या अपघाताबाबत त्यांनी जिल्ह्यातील पोलीस अधिकार्‍यांशी संवाद साधून माहिती जाणून घेतली. याप्रसंगी त्यांच्या सोबत जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अप्पर अधिक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

Protected Content