पुलवामातील शहिदांना ‘एक दिवा, एक पणती’ उपक्रमाद्वारे श्रद्धांजली

चाळीसगाव -लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात भारतमातेच्या वीर जवानांना १४ फेब्रुवारी रोजी हौतात्म्य प्राप्त झाले होते. त्यांची आठवण सतत हृदयात तेवत राहावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे “एक दिवा… एक पणती… आपल्या शहीद जवानांसाठी..!!! हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 

जळगाव ग्रामीण भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्षा रेखाताई पाटील ह्याच्या मार्गदर्शनाखाली शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभाताई मंगेश चव्हाण यांच्यावतीने चाळीसगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मेणबत्ती लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. भारत माता की जय… वंदे मातरम… वीर जवान… तुझे सलाम… च्या घोषणा देत उपस्थित शिवनेरी फाउंडेशनच्या सदस्यांनी आपल्या जवानांचे स्मरण केले. याप्रसंगी भाजपा जळगाव जिल्हा महिला अध्यक्ष रेखाताई पाटील, जिल्हासरचिटणीस संगिता पाटील, संध्या पाटील, शिवनेरी फाउंडेशन अध्यक्षा प्रतिभाताई चव्हाण, नगरसेविका विजयाताई प्रकाश पवार, विजयाताई भिकन पवार, योजनाताई पाटील, सोनलताई वाघ, मनिषाताई पाटील, भाजपा शहर सरचिटणीस अमोल नानकर, विपुल पाटील, तुषार देसले, सूर्यकांत शेलार, सौरभ पाटील, मयुर पाटील, अजय अहिरे, धिरज पवार, यश चिंचोले, मयुर घोरपडे, सागर पगारे आदी उपस्थित होते.

Protected Content