पुणे प्रतिनिधी । येथील सुखसागर नगरात एका कटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. परिस्थितीला कंटाळून आपण हे पाऊल उचलल्याचे त्यांच्या घरातील भिंतीवर लिहल्याचे आढळून आले आहे.
लॉकडाऊनमुळे अनेक कुटुंबांसमोर अर्थाजनाचे साधन नसल्याने लोक हवालदील झाल्याचे दिसून येत आहे. यातच पुण्यातील एका कुटुंबाने परिस्थिती खराब असल्याच्या कारणाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. सुखसागर नगर परिसरातील गल्ली क्रमांक एक येथे राहणार्या एका कुटुंबातील चौघांनी बुधवारी रात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पती-पत्नी आणि दोन लहानग्यांचा यामध्ये समावेश होता. अतुल दत्तात्रय शिंदे (३३ वर्ष), जया अतुल शिंदे (३२ वर्ष), ऋग्वेद अतुल शिंदे ( ६ वर्ष) आणि अंतरा अतुल शिंदे ( ३ वर्ष) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या चौघांचे मृतदेह घरात लटकलेल्या स्थितीमध्ये आढळून आले. यात बाजूच्या भिंतीवर परिस्थिती खराब असल्याने आम्ही हे पाऊल उचलले असून या प्रकरणी कुणाला जबाबदार धरू नये असे लिहण्यात आलेले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे.