पारोळा येथे विद्युतवाहक पोल व ताराला बसविले सुरक्षा कवच

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील शेळावे येथील जिल्हा परिषद शाळेसमोर बाल सुरक्षा म्हणुन या पोलला व ताणला काहीतरी ठराविक उंची पर्यंत सुरक्षा कवच बसविण्यात आले.  त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

गेल्या तीन चार वर्षापासुन पावसाळ्याच्या अगोदर वादळ वारे, गारपीट, झाडाच्या फांदया तार व पोलवर पडुन वीज वाहक पोल व त्याला दिलेला ताण हे लोखंड या धातुचे असल्याने त्यात तांत्रिक बिघाड निर्माण होवुन वीज प्रवाह उतरतो. गावात व शेतात अशा पोलला व ताणाला अनावधानाने स्पर्श होवुन अनेक नागरिक व प्राणी बळी पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. असाच वीज वाहक पोल व ताण अगदी लागुन जि.प. उच्च प्राथ शाळा दगडी सबगव्हाण ता पारोळा शाळेत मागच्या महिन्यात शिक्षण परीषदेला उपस्थित असलेल्या धाबे शाळेचे राज्य शिक्षक मनवंतराव साळुंखे यांच्या लक्षात आला . तेव्हाच त्यांनी ठरविले की बाल सुरक्षा म्हणुन या पोलला व ताणला काहीतरी ठराविक उंची पर्यंत सुरक्षा कवच बसवायचे. शाळेच्या मुख्याध्यापिका रत्ना भदाणे, पदविधर शिक्षक गिरीष वाणी, रत्नाकर पाटील, हितेंद्र तावडे, प्रतिभा वाडीले, प्रतिभा पाटील यांनी आपल्या परीने त्या पोलला सुरक्षित करण्याचा प्रयत्न व तो पोल इतरत्र हलविण्याची विनंती करणारा पत्रव्यवहार ग्रामपंचायत व महावितरणशी केलेला होता. पण हे जेव्हा होईल तेव्हा सध्या गारपीटची शक्यता व पुढे येणारा पावसाळ्या अगोदर त्या पोल आणि ताणला एक मजबुत सुरक्षित व ठराविक उंची पर्यंत सुरक्षा कवच बसविणे गरजेचे व आवश्यक होते. त्यांनी सध्या घरी आलेले आपले मित्र गौरव शिंपी – गवांदे , विद्युत सहाय्यक मंचर पुणे ( पारोळाकर ) यांच्याशी चर्चा केली व त्या पोलला प्लास्टिक पाईपचे सुरक्षा कवच बसविण्याचा विचार व संकल्पना सांगितली. गौरव गवांदे महावितरणातच असल्याने त्यांना या गोष्टीची गरज व महत्व माहित असल्याने याबाबत येणारा सर्व खर्च करून शाळेवर पाईप नेऊन हे सुरक्षा कवच बसविण्याची ईच्छा व्यक्त केली. त्या नुसार आज शाळा शिक्षक व जाणकार ग्रामस्थांच्या मदतीने ते बसविण्यात आले . हा बाल सुरक्षा प्रयत्न बघुन अनेक उपस्थित महिला व पुरुष ग्रामस्थांनी समाधान व आनंद व्यक्त केला.

यावेळी गांवाचे सरपंच नंदलाल पाटील , शेळावे केंद्र प्रमुख जितेंद पवार, राज्य शिक्षक मनवंतराव साळुंखे , शाळा व्यवस्थापन अध्यक्ष छोटु पाटील , शाळेतील सर्व शिक्षक व अनेक ग्रामस्थ बंधु बघिनी उपस्थित होते.  केंद्र प्रमुख जितेंद्र पवार यांनी मनवंतराव साळुंखे व गौरव गवांदे यांच्या या बाल सुरक्षा उपक्रमाचे कौतुक करुन असाच प्रयत्न ज्या शाळा, कॉलेज, सार्वजनिक दवाखाने, कार्यालय जेथे वर्दळ असते व असे पोल असतील तर त्यांना सुरक्षिततेसाठी लोक सहभागातुन असे सुरक्षा कवच बसविण्याचा प्रयत्न करावा असे अवाहन केले.

Protected Content