पळासखेडे(मिराचे) येथे दफनभूमीसाठी जागा द्या : विरशैव लिंगायत गवळी समाजाची मागणी

जामनेर, प्रतिनिधी | विरशैव लिंगायत गवळी समाजातील प्रथा व परंपरेनुसार मयत व्यक्तीचे दफन विधी करण्यात येतो.या अंतीम विधीसाठी पळासखेडे(मिराचे) ग्रामपंचायत अंतर्गत गावठाण परिसरातील स्वतंत्र जमीन उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी समाजातर्फे ग्रामपंचायत प्रशासनास निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

महाराष्ट्र राज्य विरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्थेच्या जळगांव जिल्हा शाखेतर्फे ग्रामपंचायत उपसरपंच रवींद्र हडप यांना निवेदन देण्यात आले. यावेळी या निवेदनात म्हटले आहे की, पळासखेडे( मिराचे) येथे गवळी वाडा परिसरात साठ ते सत्तर वर्षापासुन गवळी समाज वास्तव्यास आहे. अनेक वर्षांपासून गवळी समाजास दिवंगत व्यक्तीच्या अंतिम दफनविधीसाठी जमीन उपलब्ध नसल्याने गैरसोय निर्माण होत आहे. तरी समाजास स्वतंत्र जमीन उपलब्ध करून देण्यात यावी. जमीन उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र राज्य विरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्था धुळे शाखा जळगाव जिल्हा अध्यक्ष दिपक जोमीवाळे यांनी निवेदन दिले. यावेळी गवळी समाज बहुउद्देशीय संस्थेचे युवा प्रदेश कार्याध्यक्ष कृष्णा गठरी, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश लंगोटे, जिल्हा खजिनदार शंकर काटकर, जिल्हा सहसचिव अशोक जोमीवाळे, ग्रामपंचायत सदस्य दिपक परदेशी ,जेष्ठ पंच आनंदाआप्पा जोमीवाळे, शिदाआप्पा देवर्षी, लक्सिमन नागापुरे, भागवत चौघुले, विशाल गवळी, विजय गवळी, अनिल गवळी आदी समाज बांधव उपस्थित होते.

Protected Content