पब्जी गेमच्या नादात १६ वर्षाच्या मुलाचा मृत्यू !

हैदराबाद (वृत्तसंस्था) आंध्रप्रदेशमधील एका १६ वर्षीय मुलाने पब्जी गेमच्या नादात अन्न पाणी सोडले आणि यातून वाढलेल्या आजाराने त्या मुलाचा मृत्यू झाला आहे.

 

लॉकडाऊनमुळे मागील अनेक महिन्यांपासून हा मुलगा घरीच असल्यामुळे त्याला या गेमचे व्यसन लागले. तो पब्जी गेम खेळू लागल्यानंतर त्याने अन्न पाण्याचाही त्याग केला. गेम खेळण्याच्या नादात तो अनेक दिवस जेवायचाही नाही. अशाने या मुलाची प्रकृती बिघडली. त्याच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले आणि त्याला डिहायड्रेशनचा त्रास होऊ लागला. शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण सतत कमी होत गेल्याने त्याची प्रकृती आणखी खालावली आणि उपचारादरम्यान सोमवारी त्याचा मृत्यू झाला.

Protected Content