पतीच्या आत्महत्येनंतर पत्नीनेही घेतला गळफास !

बीड (वृत्तसंस्था) पतीने आत्महत्या केल्यानंतर पत्नीनेही गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील चकलंबा येथे घडली आहे. दरम्यान, या दाम्पत्याचे अवघ्या एक वर्षापूर्वी लग्न झाले होते.

गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील रणजित जाधव ( 22 वर्षे) आणि मिनाक्षी जाधव ( 20 वर्षे) यांचा एक वर्षापूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर रणजीत पत्नी मिनाक्षीसोबत औरंगाबाद येथे भाड्याच्या खोलीत राहत होते. बुधवारी रणजित जाधव याने औरंगाबाद याठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली. शवविच्छेदन करुन रणजित जाधव याचे पार्थिव रात्री उशिरा चकलांबा या गावी आणून अंत्यसंस्कार करण्यात आले. नातेवाईक दु:खात असतानाच गुरूवारी सकाळी ८ वाजता घरालगत असलेल्या शौचालयातील आडूला दोरी बांधून मिनाक्षी हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, या जोडप्याने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Protected Content