पंतप्रधानजी तुम्ही न घाबरता बोला, संपूर्ण देश तुमच्या मागे उभा आहे : राहुल गांधी


नवी दिल्ली (वृत्तसंस्था)
पंतप्रधानजी तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. पण देशाला खरे सांगावे लागेल. तुम्हाला खरं बोलावे लागेल. जर तुम्ही म्हणालात की जमीन घेतली नाही आणि जमीन घेतली असेल तर चीनचा फायदा होईल. आपल्याला यांच्याविरोधात एकत्र लढायचे आहे. त्यांना बाहेर हकलवून लावायचे आहे. त्यामुळे न घाबरता तुम्ही बोलावे. संपूर्ण देश तुमच्या मागे उभा आहे, असे कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

 

 

राहुल गांधी यांनी ट्विटरवर ‘प्रधानमंत्री जी, देश आपसे सच सुनना चाहता है।’ असा कॅप्शनसहीत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये राहुल म्हणताय की, भारताच्या वीर शहीदांना माझे अभिवादन. संपूर्ण देश एकत्र येऊन, एकात्मतेने आपल्या भारतीय सेनेबरोबर आणि सरकारबरोबर उभा आहे. मात्र यामध्ये एक खूप महत्वाचा प्रश्न समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं की भारताची एक इंच जमीनीही कोणी घेतलेली नाही. कोणीही भारताच्या हद्दीत आलं नाही. मात्र लोकं बोलतायत त्याप्रमाणे, उपग्रहांनी काढलेल्या फोटोंमध्ये दिसतयं, लडाखमधील जनता सांगतेय इतकचं काय लष्कारातील निवृत्त जनरलही सांगत आहेत की चीनने आपला भूभाग ताब्यात घेतला आहे. एका जागी नाही तर तीन जागी चीनने आपला भूभाग बळकावला आहे. आपले हे जे शहीद सैनिक आहेत त्यांना हत्यारांशिवाय काय पाठवण्यात आलं आणि कोणी पाठवलं?, असा शेवटचा प्रश्नही सरकारला विचारला आहे.

Protected Content