नुकसानीची भरपाईबाबत आ. किशोर पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

पाचोरा, प्रतिनिधी| सरकारने नुकतीच १४ जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई जाहीर केली. मात्र यात जळगाव जिल्ह्याला वगळण्यात आल्याने त्यात जिल्ह्याचे समाविष्ट करून तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी आ. किशोर पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

 

राज्य सरकारने नुकतीच अतिवृष्टीमुळे  नुकसान झालेल्या १४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २ हजार ८०० कोटीची मदत काल जाहिर केली होती. त्यात ळगाव जिल्ह्याला वगळण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यात ५ लाख हेक्टरवर नुकसान होऊनही वगळण्यात आल्याचे कळताच आ. किशोर पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर गुलाबराव पाटील यांनी आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत आक्रमकपणे हा विषय मांडला. त्यावर शासनाने जळगाव जिल्ह्याचा समावेश करण्याबाबत मान्य केल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगीतले. पाचोरा – भडगाव तालुक्यात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे. त्यासंदर्भात जास्तीची मदत देण्याबाबत आमदार किशोर पाटील यांनी मुख्यमंत्र्याकडे मागणी केली होती. त्यानंतर एस. डी. आर. एफ. च्या दरापेक्षा अधिक मदत देण्याचे शासनाने जाहीर केले होते. काल शासनाने मदत जाहीर केली. मात्र त्यात जळगाव जिल्ह्याला वगळण्यात आले होते. हे कळताच आमदार किशोर पाटील यांनी लागलीच मुंबईत येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. यावेळी आमदार किशोर पाटील यांचे स्विय्य सहाय्यक राजेश पाटील, पाचोरा नगरपरिषदचे नगराध्यक्ष संजय गोहिल उपस्थित होते. दरम्यान पालक मंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन दिले. त्यानंतर जळगाव जिल्ह्याचाही  समावेश होणार असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.

 

 

Protected Content