नारळ फुकट मागितल्यावरील वादातून चाकू हल्ला; परस्पर विरोधी गुन्हे दाखल

भुसावळ प्रतिनिधी । नारळ फुकट मागितल्यावरून झालेल्या वादात चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना शहरात घडली असून या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,श्रीराम नगर भागातील बंटी तायडे यास रवी ढगे, संजय ढगे,भावेश ढगे,पिंटू काळे व सुश्रुत झोपे यांनी एकाल नारळ फुकट मागितले असता फिर्यादीने नकार दिला. याचा राग आल्याच्या कारणावरून त्यांनी बंटी वर चाकू,चॉपर, लोंखडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले. याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनला फिर्यादी तुषार अनिल जंजाळे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार कलम ३२६,३२३,१४३, १४७,१४८ ,१४९, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमीवर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात उपचार सुरू आहे.

दरम्यान याच भांडणात फिर्यादी संजय जगन्नाथ ढगे (वय ४० राहणार श्रीराम नगर भुसावळ) यांनी फिर्याद दिली की बंटी तायडे (पूर्ण नाव माहीत नाही रहिवासी श्रीराम नगर) याने काही एक कारण नसतांना भांडण करून मारामारी केली. या फिर्यादीवरुन आरोपी बंटी तायडे यांच्या विरुद्ध बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुरुन ५९८/२०२० कलम ३२४ प्रमाणे बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.पुढील तपास पोहेकॉ वाल्मिक सोनवणे करीत आहे.

Protected Content