नागरी समस्या सोडवण्यासाठी कृती समितीचे धरणे आंदोलन

नशिराबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद शहरातील समस्यांबाबत प्रशासन गंभीर नसून निवेदने व तक्रारी देऊनही एकही प्रश्न सोडविले जात नाही. या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात या मागणीसाठी नशिराबाद नागरी कृती समितीच्या वतीने बुधवार २ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता नशिराबाद नगरपरिषदेसमोर एक दिवसयीय धरणे आंदोलन करण्यात आले.

नशिराबाद शहरातील कादरीनगर, ताज नगर, मनियार मोहल्ला, नीचवास मोहल्ला, हेडकर अली मोहल्ला, चौपाल मोहल्ला, बालेमिया मोहल्ला, बारादरी मोहल्ला या वार्डातील गटारी व ढापे, डांबरी रस्ते, सिमेंटचे रस्ते, साफसफाई, आरोग्य, पाणीपुरवठा, विद्युतपुरवठा, प्राथमिक आरोग्य केंद्राची वेळ वाढवून मिळणेबाबत, शववाहिका व रूग्णवाहिका सेवा यासह आदी विविध मागण्यांसाठी मुख्याधिकारी रविंद्र सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. प्रलंबित प्रश्न येत्या ३० दिवसात न सोडविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

धरणे आंदोलनात जळगाव जिल्हा मुस्लिम मणियार बिरादरीचे फारुक शेख, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष अहमद काझी, कादरी अब्दुल रऊफ, फुरकान शेख, सलमान सुतार, आकिब शेख, वासिफ सय्यद, रईस सय्यद, नजमाबी, शहेनाझबी, जूबेदाबी यांनी मार्गदर्शन केले. तर अब्दुल रउफ टेलर, इब्राहिम टेलर, तोफिक खान, नाझीम सय्यद, नजर अली, अन्सार मनियार, युसुफ बेग,पि.के. शेख,वकार अली बिस्मिल्ला सुतार यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला.

Protected Content