जळगाव राहुल शिरसाळे । तालुक्यातील नांद्रा ग्रामपंचातीच्या निकालानंतर लोकमान्य पॅनलचे विजयी झालेल्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला. पहा याचे लाईव्ह कव्हरेज..
नांद्रा बुद्रुक येथील महाविकासआघाडी लोकमान्य पॅनल अध्यक्ष तथा कृउबाचे उपसभापती सुरेश पाटील यांच्या पॅनेलला बहुमत मिळाले असून त्यांनी त्यांची परंपरा कायम ठेवली आहे. नांद्रा गावाच्या विकासासाठी नेहमी आघाडीवर आणि तत्पर असणारे त्यांच्या उमेदवार मनोज सुरेश पाटील, जनाबाई एकनाथ सोनवणे, कविता कैलास पाटील, गणेश रामचंद्र सोनवणे, प्रकाश बन्सी सोनवणे, मीना सुरेंद्र सोनवणे रेखा समाधान पाटील, वैशाली विजय बाविस्कर यांचे प्रचंड बहुमताने विजय झालेला असून त्यांची पुढची राजकीय धोरणे ही विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ते गावाच्या विकास आपण कटीबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.
https://www.facebook.com/508992935887325/videos/247319663511050