धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने वृद्धाचा मृत्यू

जळगाव, प्रतिनिधी । धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाला. हरीविठ्ठलनगर परिसरात १५ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता ही घटना घडली. विठ्ठल त्र्यंबक महाजन (वय ६०, रा.खंडेरावनगर) असे मृत वृद्धाचे नाव आहे. महाजन हे वाहनचालक होते.

दि. १५ रोजी रात्री ९ वाजता विठ्ठल महाजन हे घरातून बाहेर पडले. थोड्या वेळाने जेवण करण्यासाठी येतो असे त्यांनी कुटंुबियांना सांगीतले होते. दरम्यान, हरीविठ्ठलनगर परिसरातील रेल्वेरुळालागत त्यांचा मृतदेह मिळुन आला. धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हरीष डोईफोडे तपास करीत आहेत. महाजन यांच्या पश्चात पत्नी रेणुबाई, मुले दिनेश व ज्ञानेश्वर, सुन व नातवंड असा परिवार आहे.

Protected Content