धरणगाव‌ येथील दोघेही तलाठी निलंबित; प्रांताधिकाऱ्यांची कारवाई

धरणगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील पाळधी बु. व चांदसर येथील दोन्ही तलाठ्यांना प्रांताधिकार विनय गोसावी यांनी निलंबनाचे आदेश निर्गमित केले आहेत. यामुळे नागरिक व शेतकऱ्यांच्या तक्रारी भोवल्या असल्याचे सांगितले जात आहे.

तालुक्यातील पाळधी बु. व चांदसर येथील तलाठी बालाजी लोंढे व सुमित गवई यांच्याविषयी नागरिकांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. त्याअनुषंगाने तहसीलदार यांनी अहवाल पाठविला होता. मात्र बालाजी लोंढे यांचा अहवाल असमाधानकारक तसेच सुमित गवई चांदसर यांनी खुलासा सादर न केल्यामुळे प्रांताधिकार विनय गोसावी यांनी निलंबनाचे आदेश निर्गमित केले आहेत. तत्पूर्वी तलाठी आपल्या मुख्यालयात न थांबणे, अतिवृष्टी याद्यामध्ये नावे वगळणे, शेतकरी व नागरिकांना फिरवणे, सात बारा साठी धरणगाव येथे बोलावणे अशा अनेक तक्रारी नागरिक व शेतकऱ्यांच्या असल्यामुळे तक्रारी दाखल केल्या होत्या. यामुळे हि कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Protected Content