देशात आतापर्यंत २०६ जणांना कोरोनाची लागण !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय वैद्यकीय संशोधक परिषदेने दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत २०६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

 

महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या ही सुरुवातीला कमी होती. मात्र आता ही संख्या वाढतेय. राज्यात कालपर्यंत करोनाग्रस्तांची संख्या संख्या ४९ वर पोहचली होती. परंतू प्रशासन सर्व प्रकारची काळजी घेत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. दरम्यान, वैद्यकीय परिषदेने आज दिलेल्या माहितीनुसार देशभरात आतापर्यंत १३ हजार ४८६ जणांचे १४ हजार ३७६ नमूने तपासण्यात आले आहेत. यातील २०६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ही आकडेवारी आज (ता.२०) सकाळी १० पर्यंतची आहे.

Protected Content