दुकान घेण्यासाठी विवाहितेचा छळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दुकान घेण्यासाठी माहेरहून २५ लाख रूपये आणावे, या मागणीसाठी विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सोमवारी २९ ऑगस्ट रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, शहरातील समता नगरातील माहेर आलेल्या रूपाली सुमित चव्हाण यांचा विवाह नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथील सुमित रविंद्र चव्हाण यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला झाला. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर पती सुमित चव्हाण याने विवाहितेला दुकान घेण्यासाठी माहेरहून २५ लाख रूपये आणावे अशी मागणी केली. पैसे दिले नाही म्हणून पतीकडून विवाहितेला शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर सासू, सासरे, जेइ, दिर, नणंद यांनी देखील पैशांचा तगादा लावला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या.

याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सोमवारी २९ ऑगस्ट रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात पती सुमित रविंद्र चव्हाण, सासरे रविंद्र दगडू चव्हाण, सासू ताराबाई रविंद्र चव्हाण, जेठ विक्की रविंद्र चव्हाण, दिर अक्षय रविंद्र चव्हाा, नणंद वैष्णवी रविंद्र चव्हाण सर्व रा. मनमाड ता. नांदगाव जि.नाशिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर पाटील हे करीत आहे.

Protected Content