दिल्ली हिंसाचार प्रकरणी अमित शाह अद्यापही गप्प का ? : ओवेसी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जमावाकडून घडवण्यात आलेल्या हिंसाचाराबद्दल, दिल्लीच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले गृहमंत्री अमित शाह अद्याप सार्वजनिकरित्या एक शब्दही बोललेले नाहीत. तसेच हिंसाचार रोखण्यात सरकार अपयशी ठरले असल्याचा, आरोप ‘एमआयएम’चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी केला आहे.

 

‘एमआयएम’चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर दिल्लीतील हिंसाचार प्रकरणी निशाणा साधत म्हटले आहे की, या सर्वातील महत्वाची व्यक्ती, केंद्रीय गृहमंत्री आणि दिल्लीच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले अमित शाह बेफाम झालेल्या जमावाकडून घडवण्यात आलेल्या हिंसाचाराबद्दल अद्याप सार्वजनिकरित्या शब्दही बोललेले नाहीत. कदाचित काही उत्तरं असतील, असे ट्वटि ओवसींनी केले आहे. या अगोदर दिल्ली हिंसाचाराबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना ओवेसींनी ही घटना देशासाठी लाजिरवाणी असल्याचे सांगितले होते.

Protected Content