दिल्लीतल्या हिंसेवरून रजनीकांतची केंद्र सरकारवर टीका

नवी दिल्ली । दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी दिल्लीत भडकलेल्या हिंसेवरून मोदी सरकारवर टिका केली असून हे केंद्राचे अपयश असल्याचा आरोप केला आहे.

दिल्लीतील हिंसाराचामुळे समाजमन अस्वस्थ झाले आहे. दरम्यान, यावरून दक्षिणेतील महानायक रजनीकांत यांनी केंद्र सरकारवर टिका केली आहे. या संदर्भात त्यांनी एक ट्विट केले असून यात म्हटले आहे की, दिल्लीत समाजकंटकांनी जो काही हिंसाचार घडवला आहे, त्यात दिल्ली पोलिसांच्या हेड कॉन्स्टेबलसह २० जणांचा मृत्यू झाला आहे. दंगेखोरांना वेळीच आवार घातला पाहिजे. खरं तर हे केंद्र सरकारचं अपयश आहे. त्यासाठी मी केंद्र सरकारचा निषेध करतो. तसेच भाजपाशी त्यांचे संबंध जोडल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जर तुम्हाला दंगेखोरांवर नियंत्रण मिळवता येत नसेल तर सत्तेतून पायउतार व्हा, असे रजनीकांत यांनी बजावले आहे
जेव्हा ट्रम्प भारताच्या दौर्‍यावर आले होते, तेव्हा केंद्रानं सावधानता बाळगण्याची गरज होती. आयबीनं आपलं काम नीट केलं नाही. हिंसा पसरवण्यांविरोधात कडक कारवाई केली पाहिजे होती. आता तरी आम्ही अपेक्षा करतो की तुम्ही सावधान व्हाल. विरोध प्रदर्शन करणार्‍यांनी हिंसक होण्याची आवश्यकता नाही. जर सीएएनं खरंच मुस्लिमांचं नुकसान होणार असल्यास मी त्यांच्यासोबत असल्याचेही रजनीकांत यांनी नमूद केले आहे.

Protected Content