….तुमची निष्क्रीयता महाराष्ट्राचे नुकसान करतेय- शेलारांची सरकारवर टीका

मुंबई प्रतिनिधी । आघाडी सरकारच्या पत्रकार परिषदेला आज भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ट्विटस्च्या माध्यमातून जोरदार उत्तर देत तुमची निष्क्रीयता हे महाराष्ट्राचे नुकसान करत असल्याची टाकी केली आहे.

महाआघाडी सरकारच्या नेत्यांनी काल सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. याला भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. त्यांनी आठ ट्विट करून सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी महाआघाडी सरकारच्या पत्रकार परिषदेतच त्यांच्या दाव्यांचे पितळ उघडे पडल्याचा दावा केला आहे. महाआघाडीचे तीन मोठे नेते एका नेत्याविरूध्द एकत्र आल्याचा उल्लेख करून हे रडवेपणाचे व नाकर्तेपणाचे लक्षण असल्याची खिल्ली त्यांनी उडविली आहे. त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या तिन्ही नेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे.

आशिष शेलार यांनी केलेल ट्विटस खाली दिलेले आहेत.

Protected Content