जळगाव प्रतिनिधी । विदगाव गावाजवळील पुलावरून आज सकाळी ११ वाजता उडी घेऊन अनोळखी तरूणाने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. चार तासानंतर त्या तरूणाची ओळख पटली असून हरीषचंद्र दिलीप धनगर (बाविस्कर) (वय-२३) रा. दहीगाव ता.यावल असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील कोळनाव्ही (विदगाव) गावाच्यापुढे तापी नदीच्या पुलावर सकाळी ११ वाजेच्या सुमारास हरीषचंद्र दिलीप धनगर (बाविस्कर) याने सकाळी ९ वाजेच्या सुमारास घरात कोणाला काहीही न सांगता स्वत:ची दुचाकी क्रमांक एमएच १९ एजी ६१२२ ने आला. दुचाकी पुलावर पार्कींग करून सरळ तापी नदीच्या पुलावरून उडी मारली. नेमके आत्महत्या करण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही. सकाळी घटनास्थळी नागरीकांची मोठ्या संख्येने गर्दी जमली होती. मयत हरीषचंद्र हा तरूण वडीलांसोबत शेती काम करतो. मोठा भाऊ प्रकाश दिलीप बाविस्कर हा जळगावात राहत असून तो जैन व्हॅली येथे कामाला आहे. त्याच्या पश्चात दोन बहिणी, एक भाऊ आणि आईवडील असा परीवार आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.