तर रस्त्यावर उतरेन, रक्षा खडसेंचा थेट ऊर्जामंत्र्यांना इशारा

 

 

मुक्ताईनगर : प्रतिनिधी ।: वीज बिलात सवलत देण्याची भाषा करणारे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आता आपला शब्द फिरवला आहे. याविरोधात भाजप नेते पुन्हा आक्रमक झाले आहेत. खासदार रक्षा खडसे यांनी तीव्र प्रतिक्रीया दिली आहे.

वीज ग्राहकांना दिलासा देण्याची गरज आहे. मात्र, सरकारनं याबाबत योग्य भूमिका न घेतल्यास जनहितासाठी भाजप रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा देखील भाजप खासदार रक्षा खडसे यांनी दिला आहे.

खासदार रक्षा खडसे म्हणाल्या, ‘जेवढं बिल आलेलं आहे, तेवढं बिल ग्राहकांना भरावंच लागेल’, असं वक्तव्य ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे. ऊर्जामंत्र्यांचं वक्तव्य सपशेल चुकीचं आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं बिल माफ करू, असं राज्यातील जनतेला आश्वासन दिलं होतं. मात्र नितीन राऊत हे एक चांगले नेते आहे. त्यांनी आपला शब्द फिरवायला नको होता. संपूर्ण वीज बिल माफ करू शकले नसले तरी काही प्रमाणात ग्राहकांना सवलत द्यायला हवी, अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी यावेळी केली आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून भाजपला सातत्याने आंदोलन करण्याची गरज पडत आहे. यावरूनच राज्य सरकारची अकार्यक्षमता लक्षात येते त्यासाठी आम्ही वेगळे काही सांगण्याची गरज नाही या सरकारमध्ये धोरणांची जाण आणि समन्वय नसल्यानेच मंत्र्यांना जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर सरळसरळ खोटे बोलावे लागते हेही आता दिसून आले आहे भाजप ही वैयक्तिक फायद्यासाठी नसून जनतेच्या हितासाठी आंदोलन करत आहेत, असं खासदार रक्षा खडसे यांनी सांगितलं.

Protected Content