तरसोद ते चिखली महामार्गावरील अपघाती वळण काढा : प्रशांत टोंगे यांची मागणी

मुक्ताईनगर, प्रतिनिधी  ।  तरसोद ते चिखली राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामानंतर कोथळी ता. मुक्ताईनगर बायपास जवळील पुलाजवळचे अपघाती वळण तत्काळ काढण्यात यावी  अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा  शिवसेनेचे शहरप्रमुख प्रशांत टोंगे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे  मुख्य अभियंता यांना पत्राद्वारे केली आहे. 

मुक्ताईनगर शहराला लागून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा गेलेला आहे. नुकताच  तरसोद ते चिखली राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामानंतर कोथळी ता.मुक्ताईनगर बायपास जवळ धोकादायक वळण ठेवण्यात आलेले आहेत. येथे दररोज अपघात होत असून काल रात्री ४ जून रोजी कोथळी येथील येथील तरुणाचा याच धोकादायक वळणामुळे अपघात होऊन त्या तरुणाचा नाहक बळी गेला. या  धोकादायक वळणामुळे आणखी अपघात घडून  नागरिकांचे बळी जाऊ शकतात.  तरी या ठिकाणी असलेल्या धोकादायक वळणाचे उड्डाणा पुलाखालील वाहतुकीचे सुनियोजन करण्याबाबत मुख्य अभियंता  स्तरावरून तात्काळ उपाययोजना करण्यात यावे अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रशांत टोंगे यांनी दिला आहे.

 

Protected Content