ठाकरे व नाईक कुटुंबांमध्ये जमीनीचे २१ व्यवहार

 

 

मुंबई : प्रतिनिधी । दिवंगत अन्वय नाईक यांचे कुटुंब आणि ठाकरे कुटुंबांमध्ये तब्बल २१ जमीनीची व्यवहार झाल्याचा गौप्यस्फोट भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

किरीट सोमय्या यांनी कालच रश्मी ठाकरे व मनीषा रवींद्र वायकर यांनी अन्वय नाईक यांची जमीन खरेदी केली असल्याचा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. यानंतर आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन सोमय्या यांनी पुन्हा नवीन गौप्यस्फोट केला.

सोमय्या म्हणाले की, अन्वय नाईक यांचा परिवार आणि ठाकरे कुटुंब यांच्यात जमीनीचे तब्बल २१ सौदे झालेले आहेत. यामुळे या दोन्ही कुटुंबांमध्ये संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. किंवा हे संबंध नेमके कशा स्वरूपाचे होते याची माहिती राज्याला मिळणे गरजेचे आहे. दरम्यान, ठाकरे कुटुंबाचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे का ? असा खोचक सवाल देखील सोमय्या यांनी केला आहे.

Protected Content