ट्रक-रिक्षाच्या भीषण अपघातात आठ प्रवाशी जागीच ठार

दापोली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । भरधाव येणाऱ्या ट्रकने प्रवाशी रिक्षाला जोरदार धडक दिल्याने ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रत्नागिरीतील दापोली तालुक्यात घडली. यात अन्य ७ प्रवासी जखमी झाले आहेत. दापोली ते हर्णै दरम्यान आसूद जोशी आळी येथे हा भीषण अपघात घडला.

 

स्थानिकांच्या मदतीने सर्व जखमींना दोपाली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. घटनेनंतर ट्रकचा चालक फरार झला आहे. अपघातग्रस्त कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत जाहीर करण्यात आली आहे. कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तसेच जखमीचा खर्च देखील सरकार करणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

 

मिळालेल्या माहितीनुसार, वडापमध्ये एकूण 14-15 प्रवासी प्रवास करत होते. यावेळी दापोलीकडे जाणाऱ्या ट्रकने हर्णेकडे जाणाऱ्या वडापला धडक दिली. या दुर्दैवी घटनेत 2 अल्पवयीन मुली आणि रिक्षा चालकासह आठ जणांना आपला जीव गमवावा लागला. अनिल सारंग असे या रिक्षाचालकाचे नाव असून, तो हर्णे गावचा रहिवासी होता. घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. याघटनेबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Protected Content