जुन्या वादातून महिलेसह कुटुंबावर जीवघेणा हल्ला

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुन्या भांडणाच्या कारणावरून कुटुंबावर हल्ला करून महिलेचा हात पकडून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील भारत नगरात २४ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मंगळवारी २३ ऑगस्ट रोजी जुन्या भांडणाच्या कारणावरून वाल्मीक नगरातील राहुल पाटील आणि विष्णू पथरोड यांनी महिलेच्या कुटुंबावर हल्ला केला. तसेच हातात तलवार घेवून घरात घूसून महिलेचा हात पकडून तिचा विनयभंग केला. तसेच घरातील सदस्यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी महिलेने भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी राहूल पाटील आणि विष्णू पाथरोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप चौधरी करीत आहे.

Protected Content