जिल्हा रूग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रूग्णाचा मृत्यू; नातेवाईकांचा आरोप

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयात दाखल केलेल्या रूग्णावर वेळीच उपचार न झाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दुपारी ३ वाजेच्या सुमारास जिल्हा कोवीड रूग्णालयात गोंधळ निर्माण झाला होता.

याबाबत माहिती अशी की, शरीफ शहा अनिफ शहा (वय-४५) रा. तांबापुरा हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांनी खासगी डॉक्टरांकडे उपचारही केले. आज दुपारी २ वाजेच्या सुमारास त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी कोरोनाची लक्षणे असल्याचे समजून तपासणी न करताच रूग्णाला दुरूनच औषधी दिले. अर्ध्यातासात रूग्णाला मृत्यू झाल्याची घोषणा वैद्यकिय अधिकारी यांनी केली. दरम्यान, वैद्यकिय अधिकारी यांनी रूणाला तपासणी न केल्यामुळे मृत्यू झाला आहे असा आरोपी नातेवाईकांनी केला आहे. दुपारी तीन वाजेच्या सुमारास जिल्हा रूग्णालयात गोंधळ निर्माण झाला होता. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत पोलीसांकडून कोणतीही कारवाई झालेली नव्हती.

Protected Content