जितेंद्र पाटील यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान

 

एरंडोल,प्रतिनिधी । आदिलशहा फारुकी बहुउद्देशीय संस्थाचा वतीने राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र केवलसिंग पाटील यांना देण्यात आला.

जळगाव जिल्हयाचे व सध्या कल्याण मुंबई येथे वास्तव्यास असलेले आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कोरोनाकाळात रस्त्यावर राहणारे बेवारस, बेरोजगार, धुणी-भांडी करणारे, हात मजुरी करणारे ७०० लोकांना दिवस रात्र जेवण देण्याच कार्य करत होते. तसेच रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी ”असेंनिकम अल्बम 30”औषधी 20 हजार लोकांना वाटप करण्यात आले ब्लड (प्लाजमा) डोनेशन कॅम्प. कोरोना या आजाराविषयी ऑनलाईन जनजागृती व पेंट करून किराणा दुकानात, एटीएम जवळ भाजीपालाचा हात गाडी लोकांना लांब लांब उभे करण्यात आले. कोरोनाकाळात गरजूंना हॉस्पिटलसाठी मदत करणे, लोकांच्या समस्या सोडवणे हा मानवतावादी दृष्टीकोण अंगीकारून हे प्रयत्न केले. तसेच जितेंद्र पाटील हे मुंबईतील हॉस्पिटल मधून गरीब व गरजू रुग्णांना मोफत किंवा अल्प दरात शस्त्रक्रिया करून देतात. ग्रामीण भागातील रुग्णांना मुंबईसारख्या शहरातील अत्याधुनिक व अद्यवावत वैद्यकीय सेवा मिळवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य शिबिरे राबवतात व गरीब व गरजू रुग्णांना रोग मुक्त करण्याचे कार्य करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करतात.  जितेंद्र पाटील यांना आतापर्यंत शंभरहून अधिक पुरस्कार मिळाले असून त्यात तीन पुरस्कार हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्टीत पुरस्कार समजले जातात. आरोग्य सेवेतील या त्यांच्या उल्लेखनीय योगदानामुळे त्यांना “”महाराष्ट्र गौरव पुरस्कार “”देऊन सन्मानित करण्यात आले.

Protected Content