जळगावात सुरभीतर्फे श्री दासनवमी पारायणाची सांगता

WhatsApp Image 2020 02 17 at 11.34.24 PM

जळगाव प्रतिनिधी – येथील सुरभी महिला मंडळातर्फे श्री दासनवमी निमित्त “श्री दासबोधाचे” पारायण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला 7 फेब्रुवारी रोजी मंजुषा राव यांनी दासबोध आणि रामदास स्वामींचे चरित्र याबाबत माहिती सांगितले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन माधुरीताई फडके यांनी केलेृह्यांनी केले. पारायणात एकूण 16 महिलांनी सहभाग नोंदविला होता. यात माधुरीताई फडके, अश्विनी जोशी, सुनीता कुलकर्णी, आशाताई कानेटकर, चारुलता जोशी, प्रमिला कंपोले, मंगला अमृतकर, यमुना पाटील, रेखा वाणी, शोभा पाटील, उषा टोके, कमल बोरोले, उषा पाटील, वत्सला चौधरी, वनिता पाटील, निर्मला टोके यांचा सहभाग होता.

तर स्वाती कुलकर्णी यांच्याहस्ते समर्थांची आरती करण्यात आली. सुनीता सातपुते, विनया भावे, नवसाचा गणपती मंदिर ट्रस्टी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाची सांगता मंगला अमृतकर ह्यांच्याकडे भंडाऱ्याने झाली.

Protected Content