जळगावात अंधश्रद्धा निर्मूलन विशेषांकाचे प्रकाशन

जळगाव, प्रतिनिधी | महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जळगाव जिल्ह्याच्या वतीने अंधश्रद्धा निर्मूलन विशेषांक प्रकाशन डॉ. मिलींद बागुल यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.अनिल लोहार हे होते.

 

अॅड. एस. ए. बाहेती महाविद्यालय येथे आयोजित अंधश्रद्धा निर्मूलन विशेषांक प्रकाशन कार्यक्रमात स्वागत शिरीष चौधरी व कल्पना चौधरी यांनी केले. डॉ.मिलींद बागुल यांनी श्रद्धा व उपासनेचे स्वातंत्र्य आपल्या संविधानात आहे. धर्मांधता लादली जाते आहे आणि धर्मांधतेच्या नावावर शोषण चाललेले आहे. हा लोकशाहीला फार मोठा धोका आहे. या शोषणाला या स्वैराचाराला पायबंद घालण्याची आवश्यकता आहे. महापुरुषांच्या विचारांची धार आपल्या लेखनात आणि विचारात येण्याची आवश्यकता आहे. सोबतच कायद्याचा आदर करण्याची वृत्ती वाढण्याची गरज असल्याचे मांडत अंधश्रद्धा निर्मूलन पत्रीका ही समाजाची किड दुरुस्त करण्याचे काम करीत आहे मानवी मनाला आणि पुस्तकांना लागलेली कीड महापुरुषांच्या विचारातूनच दुरुस्त होऊ शकते असेही त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अनिल लोहार यांनी श्रद्धा, अंधश्रद्धा व विश्वास समजून घेण्यासाठी कार्यकारणभाव व वैज्ञानिक दृष्टिकोन अभ्यासले पाहिजे आणि हे सर्व विवेक जागृत ठेवून शक्य आहे असे प्रतिपादन केले. प्रा. दिलिप भारंबे यांनी अंधश्रद्धेचा अंधार हटवण्यासाठी अंनिप महत्वाची भूमिका बजावत आहे. प्रास्ताविक जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर कट्यारे यांनी केले. सूत्रसंचालन सुरेश थोरात यांनी केले. आभार जळगाव शहर शाखेचे कार्याध्यक्ष जितेंद्र धनगर यांनी मानले. कार्यक्रमास राजेंद्र चौधरी, प्रा.गौतम हिवाळे, रवींद्र पाटील, प्रा.डॉ.गौतम भालेराव, प्रा.राहुल बनसोडे, प्रा. खेमराज खडके विद्यार्थी ,विद्यार्थिनी उपस्थित होते.

Protected Content