जळगावातील प्रभात चौकात परप्रांतीय ४५ मजूरांना घेवून जाणारा ट्रक पकडला

जळगाव प्रतिनिधी । नाशिक येथून उत्तरप्रदेशात ४५ मजूरांना घेऊन जाणारा ट्रक जिल्हा पेठ पोलीसांनी प्रभात चौकात आज दुपारी पकडला. ट्रकमधील सर्व मजूरांना खबरदारी म्हणून जिल्हा कोवीड रूग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी दिली.

अधिक माहिती अशी की, जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पथक आज महामार्गावर गस्त असतांना एक ट्रक संशयित जात असल्याचे पोलीसांच्या लक्षात आला. त्यांनी ट्रकचा पाठलाग करून प्रभात चौकात पकडला. यात ४५ परप्रांतीय मजूर असल्याचे निष्पन्न झाले. नाशिक येथून पायी चालत असतांना पुढे जाण्यासाठी ते ट्रकमध्ये बसले होते. पोलीसांनी अधिक चौकशी केली असता सर्व मजूर नाशिक येथून उत्तरप्रदेशात आपापल्या गावाकडे जात असल्याचे समजले. दरम्यान मजूरांपैकी कोणाकडेही परराज्यात जाण्याची कोणतीही परवानगी नसल्याचे पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी खबरदारी म्हणून सर्वांतना तातडीने जिल्हा कोवीड रूग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले असून सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. जिल्हा पेठ पोलीसांनी ट्रकचालकास ताब्यात घेतले असून त्यांच्यावर संचारबंदी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक पटेल यांनी दिली.

Protected Content