जनता कर्फ्युला प्रारंभ; देशभरातील व्यवहार होणार ठप्प

जळगाव प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या प्रतिकारासाठी जाहीर केलेला जनता कर्फ्यू आज सकाळी सात वाजेपासून सुरू झाला असून यामुळे देशभरातील व्यवहार ठप्प होणार आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी रविवारी सकाळी सात ते रात्री दहाच्या दरम्यान जनता कर्फ्यू जाहीर केला होता. यात प्रत्येक नागरिकाने स्वच्छेने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले होते. यानंतर अगदी केंद्र व राज्य सरकारांपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांनी जनता कर्फ्यूत सहभागी होण्याचे आवाहन केले असून यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमिवर, सकाळी सात वाजेपासून जनता कर्फ्यु सुरू झालेला आहे.

Protected Content