चंद्रकांत पाटलांना राज ठाकरेंचे आकर्षण !

 

मुंबई : वृत्तसंस्था । राज ठाकरेंबद्दल आपल्याला आधीपासूनच अट्रॅक्शन वाटत होतं, व्हेरी नाईस पर्सनॅलिटी, फक्त दिसणंच नाही, तर बोलणंही, अशा शब्दात चंद्रकांत पाटील राज ठाकरेंवर स्तुतिसुमनं उधळत होते !

 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी जाऊन भेट घेतली.  दोन बड्या नेत्यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळाचे डोळे याकडे लागले होते. मात्र या भेटीत मनसे आणि भाजप एकत्र येऊन निवडणुका लढवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असं चंद्रकांतदादांनी स्पष्ट केलं.

 

“ज्यावेळी मी सिद्धार्थमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करत होतो, तेव्हापासूनच माझ्या मनामध्ये राज ठाकरेंबद्दल अॅट्रॅक्शन होतं. व्हेरी नाईस पर्सनॅलिटी, फक्त दिसण्यापुरती नाही, तर बोलणं, बोलण्यातील स्पष्टता, आपल्या मुद्द्यांवर आग्रही राहणं, फ्लेक्जिबल आहेत, पण थोडे रिजीडही आहेत ते, व्यक्ती म्हणून एकमेकाचं सुख पाहणं, यश पाहणं, हा भाग आहेच. पण तुमची भूमिका जरा बदला की हो, तुम्ही महाराष्ट्राचे नेते झाले पाहिजेत, मनसेचं इन्फ्रास्ट्रक्चर, या आधारे व्हाल तुम्ही महाराष्ट्राचे नेते, पण याला वेळ लागेल. मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, मोठ्या भूमिकेत तुम्ही यायला पाहिजे, हे एक माणूस म्हणून सांगणं वेगळं, पण मी भाजपचा राज्याचा अध्यक्ष आहे, त्यामुळे मनसे आणि भाजप एकत्र येऊन निवडणुका लढवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही” असं चंद्रकांतदादांनी स्पष्ट केलं.

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांची माझी नाशिकला अचानक भेट झाली. तेही प्रवासात होते, मी ही प्रवासात होतो. त्यावेळी आमचं बोलणं झालं, मुंबईत केव्हातरी घरी भेटूया. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे, घरी बोलावणं.. पहिला प्रश्न आहे भाजप महाराष्ट्र अध्यक्ष घरी का गेले, भाजप प्रदेश कार्यालयात का गेले नाहीत, मुळात मी असा अहंकार बाळगणारा नाही.

 

भाजपचीच नाही तर महाराष्ट्राची संस्कृती आहे, कोणी घरी बोलावलं तर येतो म्हणणं… त्यांच्या निमंत्रणाचं स्वीकार करुन मी घरी आलो.. दोन राजकीय नेते भेटतात तेव्हा राजकीय चर्चा होतेच, ती झाली. परंतु भाजप-मनसे युतीचा प्रस्ताव या बैठकीत नव्हता. एकमेकांना समजून घेणं, राजकीय चर्चा असेल तर ती युतीची नाही, एकमेकांच्या भूमिकांची झाली

कुठल्याही माणसाच्या दोन भूमिका असतात, एक माणूस म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून, नेता म्हणून.. माणूस म्हणून मला त्यांच्या भूमिकांवर चर्चा करायची होती. प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते, नाशिकला ते ही जातात मी ही जातो, आम्ही अचानक भेटलो. मी गेले वर्षभर बोलतोय त्यांनी त्यांची भूमिका बदलावी.. नाशिकमध्ये समोरासमोर भेटलो, आज चर्चा झाली.. राज म्हणाले, यूपीतील माणसाला यूपीमध्ये ८० टक्के नोकऱ्या हव्या, हे मी यूपीत जाऊन म्हणेन, तसंच मी महाराष्ट्रातील मराठी मुलांना इथेच रोजगार मिळायला हवा, असे म्हणण्यात  गैर काय ? कुठलीही दोन महाराष्ट्रातील हिंदू माणसं भेटतात, तेव्हा निघाताना पुन्हा या असं सांगणं असतंच, या पुन्हा भेटीला राजकीय संदर्भ नाही,  वहिनी आल्या त्या म्हणाल्या पुढल्यावेळी पत्नीला घेऊन या, मी त्यांना सांगितलं इथून 50 पावलांवर त्यांचं ऑफिस आहे.. त्याही येतील , असे चंद्रकांत पाटलांनी सांगितलं

 

या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल सव्वा तास चर्चा झाली. या भेटीत राजकीय चर्चा झाली. पण मनसे-भाजपच्या युतीचा या भेटीत प्रस्ताव देण्यात आलेला नाही. युतीवर चर्चाही झाली नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.  राज ठाकरे माझ्या घरी चहा प्यायला आले तर मला आनंदच होईल, असंही ते म्हणाले.

 

आम्ही जर रयत संघटना आणि इतरांना मान देऊ शकतो, तर राज ठाकरे हे मोठं नेतृत्व आहे. राज ठाकरे यांच्याबाबत भाजप कोअर टीम निर्णय घेईल, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली होती.

 

तुम्ही काही तरी सांगत होता आणि राज ठाकरे ऐकत होते. त्यांना नेमकं काय सांगत होता? असा सवाल चंद्रकांतदादांना करताच ते फक्त हसले. बरेच दिवस झाले भेटलो नाही, असं मी त्यांना म्हणत होतो. ते म्हणाले, मुंबईत कधी येतोस.  आम्ही विद्यार्थी चळवळीत होतो. 40-42 वर्षापासूनची आमची मैत्री आहे. त्यानंतर भेट झाली नाही.

Protected Content