घोटाळा करणार्‍या राहूल कूल यांच्यावर कारवाई का नाही ? : संजय राऊत

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भाजपचे आमदार राहूल कूल यांनी शेकडो कोटींचा घोटाळा केला असून याची कागदपत्रे देऊन देखील त्यांच्यावर कारवाई का होत नाही ? असा प्रश्‍न खासदार संजय राऊत यांनी आज विचारला आहे.

 

उद्धव ठाकरे गटाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी आज सकाळी पुन्हा एकदा सरकारला लक्ष्य केले. यात त्यांनी आमदार राहूल कूल यांच्या प्रकरणावर विवेचन केले. भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्यात तब्बल ५०० कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे.

 

भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्यात ५०० कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात ही तक्रार मी केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी माझ्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे आता मी सीबीआयचे दरवाजे ठोठावले आहेत. बघुयात पुढे काय होतंय, असं संजय राऊतांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Protected Content