

भडगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील गुढे गावाजवळ गिरणा धरणाचा जामदा डावा कालवा हा आज दुपारी पाच वाजेच्या सुमारास फुटल्याची घटना घडली आहे.
जामदा डावा कालवा फुटल्याने पाणी मोठ्याप्रणात वाया गेले. तर रब्बी हंगामाच्या शेवटच्या आवर्तनाची वाट अवघड झाली आहे. कालव्यावरील जलसेतुची भिंत तुटली आहे. कालवा फुटल्याबरोबर जामदा बंधाऱ्यातून कालव्याचा पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याचे गिरणा पाटबंधारेचे अधिक्षक अभियंता धर्मेंद्रकुमार बेहरे यांनी सांगितले आहे.


